पुणे अभिमान

अभिमानास्पद! 

केन्द्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयातर्फे सोमवारी प्रसिद्ध  करण्यात आलेल्या यादीत पुणे हे रहाण्यासाठी,जगण्यासाठी सर्वात सुंदर  शहर ठरले आहे.
मूळातच पुणे हे एक भाग्यवान शहर आहे.सुंदर  निसर्ग ,गर्व करावा अशी ऐतिहासिक  परंपरा लाभलेलं,अनेक सुंदर  देवस्थानं असलेलं.पुणेकरांनी आपल्या बुद्धीवैभवानी पुण्याला विद्येचं माहेरघर बनवलं आणि आता उद्योगांचं,IT क्षेत्राचही.
जिजाऊआईसाहेबांनी,छोट्या शिवबासमावेत,छोट्या पुनवडीची पुण्य नगरी केली. पण इतिहास इथेच थांबत नाही.पेशव्यांनी मराठ्यांचं वैभव कळसाला नेलं.
पुढे अप्पा बळवंत,चापेकरबंधु असे देशासाठी फासावर चढलेले क्रांतीकारक,लोकमान्य टिळकांसारखा,बुद्धीमान,धडाडीचा,द्रष्टा राजकारणी आणि समाजकारणी,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले आणि  महर्षी कर्वे हे स्रीशिक्षणाचा पाया घालणारे आणि प्रसार करणारे समाज सुधारक,र,धो.कर्वे, दिनकरराव व इरावतीबाई कर्वे,न.चि. केळकर,रँगलर परांजपे,शकुंतला परांजपे,अनेक विचारवंत,समाजधुरीण याच पुण्यातले.
सिंहगड,पर्वती,चतुःशृंगी,जोगेश्वरी,कसबा गणपती,सारसबाग, शनिवार वाडा,फर्ग्युसन टेकडी, राजा केळकर म्युझियम अशी काही धार्मिक ,काही पर्यटन स्थळं, आपला शेकडो वर्षांचा लौकिक  जपून आहेत. लोकमान्यांनी  सुरू केलेला गणपतीउत्सव आणि  दगडूशेठ गणपती जगभर प्रसिद्ध  आहेत.
सावित्रीबाई फुले विद्यापिठ,एस. एन. डी. टी.,फर्ग्युसन ,एस,पी, वाडीया,अनेक नामवंत जुन्या शाळा या बरोबर अनेक शाळा,काॕलेजे प्रसिद्ध  आहेत.
पुण्याचे उद्योगक्षेत्र,IT hubs देशी,परदेशी तरुणांना आकर्षित  करतात.
एन.डी. ए.ही राष्ट्रीय  प्रबोधिनी सैन्याचे अधिकारी घडवते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने  महत्वाच्या अनेक संस्था पुण्यात आहेत.
कलेचा वारसाही पुण्याला मोठा लाभला आहे. प्रभात स्टुडीओ,म्हणजे आजचे,फिल्म इन्टीट्यूट,सवाई गंधर्व मोहोत्सव,वसंत व्याख्यानमाला,बालगंधर्व,टिळकस्मारक,अशी अनेक नाट्यगृहे,जुन्यापासून मल्टीप्लोक्स पर्यंत सिनेमागृहे, पुणेकरांच्या गायन,नृत्य,नाटक,सिनेमा वेडाची साक्ष देतात.
पुणेकर रसिक खादाड ही आहेत. चितळे,प्रभा विश्रांती गृह,बेडेकर मिसळ असे जुने अभिमान बाळगणारे,वैशालीचा वाढदिवस परदेशात करणारे,पुणेकर खरे खाद्य रसिक आहेत. पुण्याला दर दहाफुटावरा असलेली हाॕटेल्स्,टपर्या रात्रंदिवस ओसंडून वाहत असतात.JWMarriet पासून अमृततुल्य पर्यंत खादाडांची गर्दी असते.
शरीर व मनाचे आरोग्य  जपणारी अनेक  उद्याने, क्रिडांगणे,जलतरण तलाव,जिम्स व उत्कृष्ट  वैद्यकीय  सेवा देणारी हाॕस्पिटल्स व अनेक  प्रसिद्ध  धन्वंतरी पुण्यात आहेत,
पुण्यातली तरुणाई,विविध क्षेत्रातील अभ्यास, संशोधन,शास्त्रीयअसो वा पाश्चात्य, संगित,नृत्य,सिनेमा,नाटक,अन्य कला,विविध खेळ,उद्योग,सामाजिककार्य ह्यात नुसता interest घेत नाही तर अनेक प्रयोग करते. अनेक सकारात्मक चळवळी येथे चालू असतात.वयस्कर मंडळीसुद्धा morningwalk बरोबर अनेक चर्चा व सामाजिक  उपक्रम चालवतात. बायकाही कशात मागे नाहीत. आणि  हो,कितीही माॕल येऊ देत,तुळशीबाग आणि  लक्ष्मी रोड ही आमची पिढ्या न् पिढ्या आवडीची खरेदीची ठिकाणं आहेत.
खूप काही लिहायचं राहून गेलय.
असो,प्रत्येक शहराची काही वैशिष्ट्ये  असतात आणि  काही प्रश्न  पण,पुण्याचेही आहेत. विशेषतः कचरा कोंडी आणि  वहातूक कोंडी. पुणं ज्या तर्हेनी वाढतय,असे प्रश्न  येणारच आणि ते सोडवायलाही पाहिजेत.
तरीही पुणं हे एक नैसर्गिक ,ऐतिहासिक ,सांस्कृतिक ,बौद्धिक  वारसा लाभलेलं सुंदर  शहर आहे आणि  तिथे येऊन रहाण्याचा मोह कुणालाही होणारच.पुणं तिथे काय उणं हे खरं असलं तरी पुण्याला उणेपण येऊ नाही व त्याचं सौंदर्य  दिवसेंदिवस वाढावं म्हणून पुणेकरांनी प्रयत्न करायलाच हवेत.
पुण्यापाठोपाठ,नवीमुंबई,मुंबई व ठाणे यांनीही नंबर पटकावले, हे विशेष अभिमास्पद. नव्यामुंबईने थोड्या काळात कौतुकास्पद प्रगती  केली आहे,आमची मुंबईनगरी सबसे प्यारी आहेच आणि  ठाणे म्हणजे तर पुण्याचाच भाऊ.ठाणेकर,सर्व बाबतीत पुढाकार घेऊन असतात. महाराष्ट्रातील  चार शहरं पहिल्या दहामध्ये यावीत हे नक्कीच  अभिमानास्पद.
जय महाराष्ट्र ! भारतमाताकी जय!
        .       विशाखा टिपणीस
               अभिमानी पुणेकर.
               १४/०८/१०१८

दोन मृत्युः आत्मघात आणि बलीदान

दोन मृत्यु! 

अगदी तरुणच दोघही. अजून धड आयुष्य न पाहिलेले. दोन्ही मृत्यु नैसर्गिक  नव्हते. एकानी मृत्युला आपणहून कवटाळलं आणि  दुसर्यानी मृत्युला छातीवर झेललं. तरीही किती फरक त्या दोन मृत्युंमधे. एक आत्महत्या आणि  दुसरं बलीदान.
आत्महत्या जी नैराश्यातून आली.नुसत्या नैराश्यातून आली असेल? की कोणीतरी brain washing केलं असेल? आपल्या मरणानी आपल्या समाजाचं ,कुटुंबाचं भलं होईल,आपण हिरो ठरू असा काहीसा विचार किंवा अविचार असेल कोणीतरी भरवून दिलेला? जीव देताना आपले असहाय आईवडील,कुटुंब डोळ्यासमोर आलच नसेल? बलीदानाने तो काही काळापुरता,काही लोकांपुरता हिरो ठरलाही.पण हे बलीदान होतं की आत्मघात. त्याच्या मृत्युला बलीदान ठरवून काही राजकारण्यांनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्नही केला असेल. तो एकाच जमातीचा भाग ठरला. जवळचे सोडून त्याचं नांवही सगळे विसरून जातील. त्याला नाहीच पण त्याच्या कुटुंबालाही काही फायदा मिळणार नाही. कुणाच्यातरी नादी लागून ओढवून घेतलेली बरबादी.जिद्द धरून जिवंत राहीला असता तर काहीही करू शकला असता.
दुसरा मृत्यु देशासाठी . खरं बलीदान. मृत्यु समोर दिसत असताना त्याच्याही डोळ्यासमोर आले असतील त्याचे प्रेमळ आईवडील,राखी तयार ठेऊन वाट पहाणारी बहिण,अजूही नविनच असणारी प्रियतमा आणि  दोन वर्षाचं अबोध पिलू.पण क्षणार्धात  समोरचा राक्षस माझ्या लाखो आईवडीलांचे,प्रिय देशबंधुभगिनींचे प्राण घेऊ शकतो मग त्याला मारायलाच पाहिजे,माझे ध्येय देशरक्षणाचे आहे, हा अगदी सुसंगत  पक्का विचार. शत्रूला तर चारीमुंड्या चीत केलच पण मृत्युला पुढे होऊन त्यानी छातीवर घेतलं तेव्हा मृत्युसुद्धा भयभीत झाला असेल.
ज्याच्या मरणाने प्रत्येक  भारतीय खराखुरा हळहळला,रडला,ज्याचं नांव अत्यंत आदरपूर्वक,अभिमानाने कायम घेतलं जाईल तो वीर हाच खरा हीरो. त्याच्या कुटुंबाचा सारा देश कायम ऋणी राहील. त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोनी लोक जमले ते आपले सर्व भेदभाव विसरून.श्रीमंत गरीब,स्त्री पुरूष,बडे सामान्य,सर्व स्तराचे,जाती धर्माचे लोक अश्रू ढाळत त्याला मानवंदना देत होते तेव्हा ते फक्त  भारतीय होते.
एकाच्या मृत्युने समाजातली दरी अधिक रुंदावली आणि  दुसर्याच्या मृत्युने सामाजिक  एकीचे दर्शन घडवले.
मेजर कौस्तुभ राणे आम्ही भारतीय, तुझे बलीदान कधीच विसरणार नाही. आमच्या मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवून तू अमर झालास.तुझ्या शौर्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत. 
                   विशाखा टिपणीस
                   ११/०८/२०१८

मैत्री दिवस शुभेच्छा.


खरंच मैत्रीला गरज आहे ,एका स्पेशल दिवसाची,संदेशाची,रेशमी धाग्याची?
जिथे प्रत्येक  श्वास उत्सव असतो, शब्दाविना भावना पोचते,मनं गुंतलेली असतात,
तिथे खरंच का अशी गरज आहे?
मैत्री, मग ती ,
तो आणि  तो,
कृष्ण सुदाम्याची असेल,
ती आणि ती,
उषा चित्ररेखेची असेल किंवा
शब्दावाचून मनं वाचणार्या
तो आणि  तीची असेल.
प्राण्या,पक्षांशी असेल,
झाडा फुलांशी असेल,
अथांग समुद्राशी असेल,
असीम आभाळाशी असेल.
निखळ,नितळ,मुक्त ,निःशंक
ती मैत्री.
कधी हास्याच्या खळखळाटात,गोंगाट कलकलाटात,
तर कधी ओलावल्या डोळ्यांनी,
समंजस शांततेत ती साजरी होते,
कधी दुसर्या बाजूनी रुसण्यात,
आणि  समजूत घालताना आपला मी सुखावण्यात असते
ती मैत्री.
गाठी भेटी,गप्पा गोष्टी,संवाद
हवाहवासा असतो
पण आवश्यक नसतो
ती मैत्री.
जिथे हेव्यादाव्यांना जागा नसते,
गैरसमज क्षणिक आणि
विश्वास अक्षय असतो,
ती मैत्री ***
तरीही  मैत्री दिवसाच्या मनःपूर्वक   शुभेच्छा. 
               विशाखा टिपणीस
               ५/८/२०१८

माझी मैत्रीण

ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर...