लघुकथा


रंगुनी रंगात या.


मोकळ्या आकाशाखाली असं पहुडणं नयनला फार आवडायचं. त्यात तो बर्याच दिवसांनी गावी आला होता.
वाडवडीलांची जमीन, नारळीपोफळीच्या बागा,वडीलोपार्जित घर इथेच असल्याने त्याच्या वडीलांनी इथेच डाॕक्टरकी केली. त्याचं  दहावीपर्यंतचं home schooling ही इथच झालं. मग मात्र आई बाबांनी शहरात जायचा निर्णय घेतला.
शहरात नविन बंगला बांधला, क्लिनिक थाटलं. बाबांचा स्वभाव आणि  हातगुण दोन्हीमुळे छान जम बसला थोड्याच दिवसात. कशाला काही कमी नव्हतं. नयनसाठी नवी गाडी.  ड्रायवर रोज काॕलेजला सोडायचा काही दिवस. पण नयनच्या गोड स्वभावामुळे लवकरच खूप मित्र जमले. मग कोणाच्यातरी स्कूटरवर नाहीतर बाईकवर काॕलेजला जाणं येणं सुरू झालं.
नयनचे आईबाबा प्रेमळ, स्नेहशील, मनमोकळे. नयनवर कधी कसलं दडपण नव्हतं. तोही हुशार ,मनमेळावू. गावाकडे जरा एकटा वाढलेला नयन इथे मित्रांमधे रमून गेला.
अभ्यासात हुशार असलेला नयन वक्तृत्व स्पर्धा  गाजवायचा, बुद्धिबळ  खेळायचा,  गणपतीत ढोल वाजवायलापण पुढे असायचा.
आई बाबांबरोबर त्याने परदेश वार्याही केल्या होत्या. आणि  गावाकडेतर महिन्या दोन महिन्यांनी चक्कर  व्हायचीच.
बघताबघता MSW करून नयन समाजकार्याला भिडला. त्यानी एक संस्था सुरू केली. अनाथ लहान मुलांना मदत करणारी. काम वाढत होतं, मदतनीस वाढत होते.मनापासून काम करणार्या नयनचं कौतुक होत होतं. परदेशी संस्थांबरोबरही संबंध असल्याने परदेशवार्याही होत होत्या. त्यात गावाकडच्या चकरा जरा कमी झाल्या होत्या.
अशातच त्याची मदतनीस म्हणुन डाॕ. निहिरा त्याच्या आयुष्यात आली. सतत खळखळून हसणारी, खूप बोलणारी, लहानमुलांना पटकन आपलसं करून समजावणारी आणि  मुख्य म्हणजे पैशाची हाव न धरता मनापासून काम करणारी. नयनचे सर्वच मित्र, सहकारी खूपच चांगले होते पण निहिरानी त्याच्या मनाचा ठाव पहिल्याच भेटीत घेतला. त्याला  प्रथम भेटणारी व्यक्ती  त्याला पहाताच अपराधी भावनेने त्याला म्हणे, " Oh, I am sorry". आणि  मग त्याला जरुरी नसलेली मदत करायची तयारी दाखवी.
पहिल्याच भेटीत निहिरा बोलली होती, " सर, तुमच्या लक्षात यायला हवं, ही मुलं प्रेमाची भुकेली आणि  कुपोशीत तर आहेतच पण त्यांच्यात आपण शिकू शकतो, काही करू शकतो ही जिद्द भरवायला हवी. जगाविषयी वाटणारी भिती घालवायला हवी. तुम्ही नुसतं त्यांना अन्न, निवारा आणि  शिक्षणाच्या सोयी देऊन नाही भागणार." तीचं स्पष्ट बोलणं त्याला आवडलं. मुख्य  म्हणजे तीनी त्याच्या व्यंगाबद्दल बिलकुल  सहानुभूती  दाखवली नाही.
बर्याच ओळखीनंतर तो तीला म्हणाला, "तू किती सहज वर्णन करतेस सगळ्या गोष्टींच, पण मला तर हे ही माहित नाही की आकाशाचा रंग नीळा म्हणजे नक्की  कसा? झाडं हिरवी म्हणजे काय?" त्यावर ती  त्याचा हात हातात घेत म्हणाली, " मोकळ्या आकाशाखाली पहुडतोस, मग एखादी वार्याची झुळुक तुला स्पर्श  करते, तीला रंग नसतोच पण त्या क्षणी सुखावून तुझ्या मनात जे आकाश येतं तोच त्याचा रंग. पानांना किंवा फुलांना ओंजळीत घेताना त्यांचा गंध नाकात शिरतो. गंधाला रंग नसतो पण स्पर्श आणि  गंध अनुभवताना डोळ्यासमोर येतो तोच त्यांचा रंग. पक्षाच्या किलबिलीला रंग नसतोच पण ती ऐकताना डोळ्यासमोर येतो तोच पक्षाचा रंग. अरे, रंग , आकार व्यवहारापुरते. अंतरंगात हरक्षणी उमटतात तेच खरे रंग!"
आत्ताही तो तेच आठवत होता, मनातल्या मनात खुल्या आभाळात रंग भरत होता. निहिराच्याच आग्रहाने तो आॕपरेशनला तयार झाला होता. इतकी वर्षे आॕपरेशन नंतर नाहीच मला हे रंगीत जग दिसलं तर? ह्या भितीनी आॕपरेशनला तो तयारच झाला नव्हता. त्याच्या मनाची तयारी निहिरानी केली. तीचं म्हणणं  " तुला दिसायला लागणारच, पण अगदी समजा नाहीच दिसायला लागलं तर आत्ता काय वाईट चाललय? आणि  मी कधीही असणारच बरोबर."कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मक तरीही व्यवहारानी पहाणं आणि  ज्यावर आपलं नियंत्रण नाही ती गोष्ट सहज स्वीकारणं, तो तीच्याकडून शिकला होता.
त्यानी दीर्घ  श्वास घेतला. उद्या तो नितळ मन घेऊन आॕपरेशनला सामोरा जाणार होता. आॕपरेशन नक्की  यशस्वी होणार मग तो दुनियेतले सगळे रंग मनसोक्त  डोळ्यात भरुन घेणार होता. पण काहिही झालं तरी त्याच्या अंतरंगात उमटलेले आईबाबांच्या वात्सल्याचे, आप्तांच्या कौतुकाचे,मित्रांच्या मैत्रीचे,सहकार्यांच्या आदराचे, निहिराच्या सुंदर  प्रेमाचे आणि  परमेश्वराच्या कृपेचे निखळ खरे , पक्के रंग कधीच फिके होणार नव्हते. आकाशाकडे हात जोडत नयन खुशीत हसला. मनापासून.

Mothers day in marathi


आज जागतिक  मातृदिन. आपल्या हिंदू संस्कृती  प्रमाणे प्रत्येक  दिवसच माता, पिता, गुरु आणि  सार्या चराचर सृष्टीच्या उत्सवाचा असतो.पण आता धावपळीच्या आयुष्यात एक दिवस का होईना मातृदिन छान साजरा व्हावा.
पूर्वी म्हणजे लहानपणी आपण आईच्या प्रेमाची महती सांगणारी गोष्ट ऐकली आहे . मुलाच्या प्रेयसीने आईचे काळीज मागितले, ते घेऊन जाताना मुलगा पडला तेव्हा त्या काळजानी विचारलं " बाळा, तुला लागलं तर नाही?"
मला वाटतं ही गोष्ट जुनी झाली आता. निदान आपल्या पिढीतल्या बर्याचशा आया, सुशिक्षित अगर अशिक्षित , निदान आर्थिकदृष्ट्या  स्वतंत्र आहेत. आणि  त्यामुळे थोड्या खंबीरसुद्धा. घरातल्या मोठ्यांची काळजी घेऊन, मुलंही मोठी झाल्यावर, कौटुंबिक  जबाबदार्या पार पाडल्यावर आमची कर्तव्य संपली का? अजुन अंगात शक्ती आहे मुख्य म्हणजे मन ताजं तवानं आहे, काहीतरी करायची इच्छा  आहे, तर मग आपल्या मातृभूमीसाठी जे करायचं बाकी आहे ते आपापल्या आवडीनुसार, कुवतीनुसार का करू नाही?खरंतर आपल्या वयाचे खूपसे लोक हे करतातच.
१) आपली मातृभूमी म्हणजे जमीन , झाडं,फळं,फुलं, पशु,पक्षी,पाणी,नद्या,निर्झर, समुद्र ,एकंदर पर्यावरण.
एखादच का होईना झाड लावून, त्याचं संगोपन करून,घरच्याच कचर्याचं खत तयार करून, परिसर स्वच्छ ठेऊन ,पाणी  वाचवून, नदीनाल्यात कचरा न टाकून , आणि  या सर्वाबद्दल इतरांना जागृत करून, मातृभूमीची सेवा म्हणजे पर्यायाने आपण स्वतःलाच मदत करीत असतो ना?
२) आपला इतिहास.
खरोखरीचे भाग्य म्हणुन आम्हाला इतक्या महान संस्कृतीचा, गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभला. फक्त  गुलामगिरीचा शिकवलेला इतिहास आणि जातीभेद, धर्मभेद,आपल्या संस्कृतीची लाज बाळगणं हे सोडून आमचा खरा इतिहास, संस्कृती  ह्याचा अभ्यास करू, इतरांनाही समजावून देऊ.अभिमानाने म्हणु आम्ही भारतीय एक आहोत, भले आमचे धर्म, जाती, भाषा,रुढी,परंपरा,पोषाख,वेगळे असतील. दुफळी माजवणार्या घटकांना दूर ठेऊ. भारताच्या  स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक  क्रांतीकारकाची, समाजसुधारकाची आदराने आठवण ठेऊ.
३) समाज.
     सर्वांशी सुसंवाद साधणं,लहान मुलांना चांगले संस्कार  देणं, नियमानी वागणं, भारतीय घटनेचा मान ठेवत आपल्या हक्कांची आणि  कर्तव्यांची जाण ठेवणं व इतरांना ती करुन देणं.जिथे आवश्यक आहे व शक्य आहे तिथे यथाशक्ति  अर्थिक, वैचारिक अगर श्रमाची मदत करणं इतकं तर आपण करु शकतो.पण कुणालाही सतत फुकट घेण्याची  सवय मात्र लागू नये. आपल्या रक्षणासाठी लढणारे सैनिक, अन्न पुरवणारे शेतकरी, पोलीस व इतर सर्व  सेवा पुरवणार्यांसाठी कृतज्ञ राहून छोटी मोठी कामे करू शकतो.
४)देशाचा अभिमान
देशप्रेम हा ऐच्छिक  विषय नाही. तुमचं अस्तित्वच ज्यांच्यामुळे आहे ते आई,वडील आणि  देश यांचा मान ठेवलाच पाहिजे. तिरंगा, राष्ट्रगीत, राष्ट्रीय संपत्ति, देशाची घटना, देशाचा प्रत्येक  नागरिक , विशेषतः स्त्रिया  व वृद्ध यांचा मान राखला गेलाच पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वरील गोष्टींचा  अपमान करणार्यांनी देशातून बाहेर जावे.
मला वाटतं आज मातृदिनाच्या निमित्ताने आपण आपल्या मातृभूमीच्या ऋणाचे स्मरण करून एखादा छोटासा का होईना संकल्प करूनआपल्या मातृभूमीप्रती  कृतज्ञता व्यक्त  करू या.
विशाखा टिपणीस
१२/०५/२०१९

माझी मैत्रीण

ही पाहिलीत का माझी मैत्रीण वरच्या फोटोतली? काय म्हणता, तुम्ही ओळखता? पांढर्या ड्रेसमधली? लेखिका आणि  प्रसिद्ध  सिनेसमिक्षक सुलभा तेरणीकर...